श्रीमद्-महावाक्य निरूपण तथा बेलापूर चरित्र निरूपण सोहळा, कुरुंदा, ता वसमत, जि हिंगोली येथे होत असलेल्या सत्संग सोहळ्यात
नववा दिवस
आज सत्संगात जीवमात्राचा उद्धार ज्या ज्ञानाने होतो त्या ज्ञानाचे निरूपण केले.तसेच वृक्षाला असणारे तेरा प्रकारचे दुःख निरूपण केले.त्याच प्रमाणे मनुष्याने ईश्वरज्ञानाबद्दल जिज्ञासा निर्माण करून ते आत्मसात करावे असे त्यांनी सांगितले. लीळाचरित्र या मराठीच्या आद्य ग्रंथातील कथासृष्टी ची माहिती दिली. विज्ञान हे शोध घेऊ शकतो पण प्राण्यांच्या ठिकाणी होणाऱ्या वेदना ,दुःख याचा ते शोध घेऊ शकत नाही असे आज निरूपण केले.अश्याप्रकारे निरूपण मार्गदर्शन करून श्री कृष्ण भगवंताच्या नामाचा जयघोषात आजचे नववे सत्र संपन्न झाले.
कार्यक्रम संयोजक – सद्भावना फाउंडेशन (बोरी)