आपला जिल्हामहाराष्ट्रसामाजिक
कुरूंद्यात 30 वर्षानंतर वर्ग मिञ स्नेहसंमेलन निमित्त आले एकत्र
रामु चव्हाण

वसमत/ रामु चव्हाण
जिल्हा परिषद प्रशाला कुरुंदा सन 1992 93 च्या बॅचचा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम तब्बल 30 वर्षानंतर आज जिल्हा परिषद प्रशाला कुरुंदा येथे साजरा करण्यात आला
*हसरते कुछ और है*
*वक्तकी इल्तिजा कुछ और है*
*कोन जि सका जिंदगी अपने मुताबिक*
*दिल चाहता कुछ और है*
*होता कुछ और है*
जिल्हा परिषद प्रशाला कुरुंदा सन 1992 93 च्या बॅचचा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम तब्बल 30 वर्षानंतर आज जिल्हा परिषद प्रशाला कुरुंदा येथे साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून सरोजिनी करजगीकर होत्या तर सर्व शिक्षक वृंद तिवारी सर, सोनटक्के सर, कंठाळे सर, बा णा देशमुख सर , कांबळे सर,कालबाजी इंगोले सर, चंद्रकांत पांचाळ सर , सेवक कुरुंदे मामा या सर्वांचा विद्यार्थ्यांच्या हस्ते येथे यथोचित सत्कार करण्यात आला , तीस वर्षांपूर्वी जसे शाळेत एकत्र जमायचं तसे सकाळी दहा वाजता जमले , राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर सर्वांचा परत एकदा परिचय देण्यात आला व सध्या कुठे असतो काय करतो त्यांचं सध्याचे आयुष्य कसे चालले या बद्दल सर्वांना प्रत्येकानी माहिती दिली, प्रत्येकाने आपले मनोगत व्यक्त केले, बऱ्याच जणांचा तीस वर्षानंतर भेट झाल्यामुळे काहींचे मत व्यक्त करताना उर भरून आले होते वातावरणामध्ये गंभीरता निर्माण झाली खूप जणांच्या डोळ्यांमध्ये पाणी आले
पण मित्रांनो आजचा दिवस आपण आपल्या मनाप्रमाणे जगलो
तब्बल तीस वर्षानंतर आपण सर्व बालपणीचे सवंगडी वयाच्या 45 व्या वर्षी आपण एकत्र भेटले
सर्व जुन्या आठवणींना उजाळा मिळाला ,
प्रत्येकाला खूप काही बोलायचं होतं….
खूप काही सांगायचं होतं….
आणि ते झालही .

आज आपण जरी वेगवेगळ्या क्षेत्रात असलो तरी *बालपणीचे मित्र ते बालपणीचे मित्रच असतात*
त्यांची बरोबरी कोणीही करू शकत नाही ..
सकाळी नऊ वाजल्यापासून ते संध्याकाळचे चार वाजेपर्यंत टाईम कसा निघून गेला हे कुणालाच कळले नाही .
खूप खूप मजा आली.
गावातील सर्व मित्रांनी दोन दिवस पूर्ण खटाटोप करून मेहनत घेतली हे अक्षरशः आज कार्यक्रमात दिसून आले हे एक प्रकारचं टॉनिकच असते .
*आज सर्वांनी दिवसभरातील आठवणीची शिदोरी घेऊन आपण आपापल्या घरी परत जात आहोत*
तरीही अजून पण मन मात्र आपण साजरा केलेल्या कार्यक्रमातच जात आहे व जाणार .असे मनोगत सर्वांनी खूप छान प्रकारे मांडले. 50 विद्यार्थी कार्यक्रमासाठी सहपरिवार आले होते त्यापैकी आज बरेच जण विविध पदावर कोणी डॉक्टर कोणी इंजिनिअर कोणी वकील कोणी राजकारण व्यापार शेती अशा सर्व क्षेत्रात कार्यरत आहे
*क्षण जातात ते*
*पुन्हा न येण्यासाठी*
*आठवणी मनात ठेवतात*
*कधीही न विसरण्यासाठी*
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कुरुंदा येथील डॉक्टर प्रभाकर दळवी ,अशोक दळवी ,गणेश दळवी ,रंगराव दळवी ,काळोजी क्यादलवार शेख मुस्तफा ,शेख फारुख हवलदार ,गोपीनाथ दळवी, प्राध्यापक नामदेव दळवी, डॉक्टर सदाशिव रोकडे ,कविता शर्मा, सविता शर्मा डॉक्टर तानाजी पातळफळे शेख रहीम शाह , शेख नवाब रामेश्वर इंगोले मन्मथ सिद्धेवार , बालाजी गोळेवार गणेश वटमें , बबनराव इंगोले यांनी विशेष प्रयत्न केले.