अंजानी फाऊंडेशनचे संस्थापक बालाजी किरवले यांच्या मातोश्रीच्या नावाने स्थापित अंजानी फाऊंडेशनला महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित
वसमत : रामु चव्हाण
निराधार, ज्येष्ठ नागरिक, वयोवृद्ध, मनोरुग्णांची अविरत सेवा करणाऱ्या जालना येथील अंजानी फाऊंडेशनला औरंगाबाद येथील मानसी महिला बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सोमवार (27 जुन ) औरंगाबाद येथील मौलाना आझाद विद्यालय, हिमायतबाग येथे आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. समाज कार्यात अग्रेसर असलेल्या फाऊंडेशनच्या अध्यक्षा ज्योतीताई आडेकर,सचिव विद्याताई जाधव शेख महेजबिन यांचे हस्ते हा पुरस्कार स्विकारला…
औरंगाबाद येथे पार पडलेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या प्रमुख पाहुणे नंदकुमार घोडेले महापौर औरंगाबाद, भद्रामारुती संस्थानचे अध्यक्ष विठ्ठु पाटील बारगड, जेष्ठ साहित्यिक ऋषीकुमार कांबळे, माजी सभापती बुलढाणा पूनम ताई राठोड होत्या तर संयोजक,मानसी बहुद्देशीय सेवाभावी संस्थाचे अध्यक्षा आशा झोड होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गीता अंभोरे यांनी केले.
अंजानी फाऊंडेशनचे संस्थापक बालाजी किरवले यांच्या मार्गदर्शनाखाली फाऊंडेशनच्या माध्यमातून अध्यक्षा ज्योती आडेकर, सचिव विद्या जाधव, उपाध्यक्ष Adv. शारदा ठोंबरे, कोषाध्यक्ष डॉ.अर्जुन वाहुळे, सहसचिव विजय जाधव व अंजानी फाऊंडेशनचे सर्व पदाधिकारी यांच्या मदतीने निराधार, वयोवृद्ध, दिव्यांग, मनोरुग्णांची सेवा करण्याचे कार्य अविरत सुरू आहे. यामध्ये अन्न, वस्त्र वाटप यासारख्या मूलभूत गरजांची उपलब्धता करून दिली जाते. फाऊंडेशनच्या वतीने गरजूंना मासिक अन्नधान्य किराणा किट वाटप करण्यात येते. शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्यात येते. या वर्षी फाऊंडेशन मार्फत ग्रामीण भागात आरोग्य सवलत कार्ड देण्यात आले. या आरोग्य सवलत कार्ड गोर गरीब, मजुरी करणारे पैशा अभावी उपचार घेऊ शकत नाही अशांना प्राथमिक तपासणीत सवलत मिळते. रस्त्यावरील निराधार लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येते. हे काम या संस्थेच्या वतीने दर वर्षी प्रमाणे उन्हाळी, हिवाळी, पावसाळी उपक्रम राबवले जातात.
अशा पद्धतीने फाऊंडेशन मार्फत विविध उपक्रम राबविले जातात. यासाठी फाऊंडेशनला पोलीस उपनिरीक्षक बालाजी किरवले, सहा.पोलीस निरीक्षक नालंदा लांडगे मॅडम यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभते. दरम्यान, अंजानी फाऊंडेशनच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन मानसी महिला बहुद्देशीय सेवाभावी संस्था औरंगाबाद
च्या वतीने हा पुरस्कार देऊन संस्थेचा सन्मान केला आहे. या पुरस्काराबद्दल संस्थेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.