आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

आमदार राजु भैय्या यांची निराधारांच्या आयुष्यात कलाटणी देणारी लक्षवेधी विधानसभेत सादर

रामु चव्हाण

संजय गांधी योजनेसाठी उत्पन्न मर्यादा वाढवा आमदार राजू भैया नवघरे

वसमत/ रामु चव्हाण

वसमत सह हिंगोली जिल्ह्यांमध्ये संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ अर्थसहाय्य योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी  उत्पन्न मर्यादा 21000 असल्यामुळे अनेकांचे अर्ज अनेक दिवस त्रुटी राहत असून अनेकांना या जाचक अटीमुळे लाभ मिळत नसल्यामुळे हा मुद्दा आज अर्थसंकल्पी अधिवेशन मध्ये वसमत विधानसभेचे तरुण तडफदार आमदार राजूभैय्या नवघरे यांनी उपस्थित केला.

  यामध्ये संजय गांधी व  श्रावणबाळ योजनेच्या 21 हजाराची उत्पन्नाची मर्यादा वाढवून ती 65 हजार रुपये करण्यात यावी अशी मागणी आमदार राजू भैय्या यांनी विधानसभेत केली.
तसेच वसमत विधानसभा मतदार संघात संजय गांधी व श्रावणबाळ योजनेच्या मंजूर झालेल्या फायली केवळ कमाविता अपत्य असल्यामुळे रद्द करण्यात आले आहेत पण यामध्ये काही पाल्य पोट भरण्यासाठी आपल्या वृद्ध मातापित्यांना सोडून बाहेरगावी कामाला जात आहेत मग मातापित्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी घ्यायची कोणी त्यामुळे ही आठ सुद्धा रद्द करून ज्यांच्या अनुदान बंद झालेला आहे त्यांचे अनुदान पूर्ववत चालू करावे अशी मागणीसुद्धा आमदार राजू भैय्या यांनी केली .
सर्व हिंगोली जिल्ह्यांमध्ये असलेल्या संजय गांधी निराधार योजनेचे समिती गठीत करण्यात यावी याबाबतही विधानसभेत मागणी आमदार राजूभैैैैैैय्या यांनी केली.

  यावेळेस  बोलताना नामदार धनंजय मुंडे यांनी लवकरात लवकर या सर्व बाबींवर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करून लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन विधानसभेत दिले. यामुळे गेली अनेक वर्षांपासून वसमत तालुक्यातील अनेक गरजू लाभार्थ्यांच्या संजय गांधी व श्रावणबाळ योजनेच्या लाभ मंजुरीचा मार्ग आमदार राजू भैया नवघरे यांच्यामुळे सुखकर होण्याचा मार्ग मोकळा होत असल्याचे यावरून दिसून येत आहे. आमदार राजू भैया नवघरे यांनी विधानसभेत निराधारांच्या आयुष्याला कलाटणी देणारी लक्षवेधी मांडल्यामुळे सर्वत्र आमदार राजू भैया नवघरे यांचे स्वागत होत आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!