वसमत/ रामु चव्हाण
वसमत तालुक्यातील भेंडेगाव रेल्वे फाटका नजीक रोज एक अपघात होत आहे यात काहीजणांना आपले प्राण गमवावे लागले तर काहीना कायमचे अपंगत्व आले आहे.या अपघातात अनेकांचे कुटुंबातील आधार गेल्याने संपुर्ण कुटुंब उध्वस्त झाले.हा रस्त्या दुरुस्त व्हावा म्हणून आमदार,नागरिक सर्वानीच वारंवार प्रशासनास कळवून सुद्धा कोणताही उपाय योजना प्रशासन यावर करीत नाहीम्हणून अखेरीस बुुुुधवारी दि.०३ ॲागस्ट रोजी शेतकऱ्यांच्या-कष्टकऱ्यांच्या हितासाठी व सर्व आजु-बाजूच्याच गावकऱ्यांच्या सोबत सकाळी ९.०० वाजता रास्ता रोको करण्यात येत आहे असल्याचे निवेदन अॅड ऋषिकेश देशमुख,उपसरपंच-सेलु(वर्ताळा) ग्रामपंचायत तथा
संचालक-कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत, मा.जिल्हा कार्याध्यक्ष-युवक काँग्रेस हिंगोली यानी उपविभागीय अधिकारी यांना दिले आहे.
Back to top button
Don`t copy text!